Thursday, 6 June 2019

सिक्कीमचे मुख्यमंत्री गोले रोलु पिकनिकची कमाल


सिक्कीमला विशेष राज्याचा दर्जा आहे. केंद्र सारकारकडून या राज्याला भरपूर निधी दिला जोतो. आनंदी माणसं सिक्कीमध्ये अधिक आहे. असा निष्कर्ष अनेक सर्व्हेनी काढला आहे. या राज्यावर गेली २४ वर्षे सिक्कीम डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता होती. पण २००९ नंतर प्रेम सिंग तमांग या आमदाराने डेमोक्रेटिक पक्षात बंडखोरी करून सिक्कीम क्रांतिकारी पक्ष काढला आणि यावेळी त्यांच्या पक्षाने बाजी मारली. प्रेम सिंग तमांग या ५१ वर्षाच्या नेत्याने २७ मे २०१९ या दिवशी सिक्कीमचा नवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

प्रेम सिंग तमांग हे त्यांचे अधिकृत नाव असेल तरी सिक्कीममध्ये सर्वजण त्यांना पी.एस गोले या प्रसिद्ध नावाने ओळखतात. सिक्कीम राज्यात आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे ‘रोलु पिकनिक!’ दरवर्षी सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाचे कार्यकर्ते रोलु या गावी जमतात. तिथे मौजमजा करीत सहलीचा आनंद लुटतात. अर्थात त्यातही राजकीय गप्पा होतातच. २००९ साली अशीच रोलु पिकनिक होती त्याला आमदार पी. सी. गोले उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांच्या या कृत्यामुळे ते बंडखोरी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. ६ सप्टेंबर २०१३ या दिवशी पी. एस. गोले यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीम क्रांतिकारी पक्ष स्थापन झाला आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून हा पक्ष सत्तेवर आला आहे. पवन कुमार चामलिंग यांची २४ वर्षांची सत्ता त्यांनी उलथवून टाकली. पी. एस. गोले. १९९४ पासून चुखुंग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहे. तेव्हापासून सातत्याने त्यांना मंत्रीपद मिळाले. २०१३ साली त्यांनी क्रांतीकारी पक्ष स्थापन केल्यावर २०१४ च्या निवडणुकीत फारसे यश लाभले नाही. २०१६ मध्ये त्यांनी मंत्रीपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यांच्यावर खटला चालला आणि आणि ते दोषी ठरले. त्यांची आमदारकी रद्द झाली. पुढील दोन वर्षे ते कारागृहात होते. तरीही त्यांची लोकप्रियता कायम राहिली. १० ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना तुरूंगातून मुक्त केले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या क्रांतीकारी पक्षाने ३२ पैकी १७ जागा जिंकल्या. पी. एस गोले यांना शिक्षा झाल्याने ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकणार नाहीत असे काहींचे मत होते. पण कायदाने त्यांना मुख्यमंत्री बनण्यास आडकाठी नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...