‘येस’ बँक ही श्रीमंतांची बँक आहे आणि श्रीमंतांनीच बुडविलेली बँक आहे. ज्यांना कोट्यवधी बुडले आणि बुडविले तरी आत्महत्या करावीशी वाटत नाही आणि तोंड लपवून फिरण्याचीही वेळ येत नाही अशा धेंडांनी ही बँक बुडविली. तरीही रिझर्व्ह बँकेने ही बँक वाचवायला कमालीची धावाधाव केली. सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी छाती फुगवून सांगितले की, रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने वेगाने काम करून रेकॉर्ड वेळेत येस बँक जीवित केली आहे. आमचा सवाल आहे की, ज्या बँकांमध्ये सामान्य माणसांची खाती होती अशा रूपी बँक, पेण अर्बन बँक, पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँक, पतसंस्था सहकारी बँका मोडीत गेल्या तेव्हा रिझर्व्ह बँक आणि सरकारने या आर्थिक संस्था वाचविण्यासाठी वेगाने पावले का उचलली नाहीत? स्टेट बँक एक आठवड्यात येस बँकेत 700 कोटी रुपये टाकून कर्जबुडव्यांचा तोटा भरू शकते तर ही सरकारी स्टेट बँक सामान्यांच्या ठेवी वाचविण्यासाठी छोट्या बँकांना आधार का देत नाही? सर्व मदत ही कायम श्रीमंतांनाच का मिळते? उद्योगपती आणि कारखानदारांसाठीच सरकारी यंत्रणा धावाधाव कशी करते?
‘येस’ बँकेचे सीईओ राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या उद्योगात कोट्यवधी पैसे गुंतवणुकीची लाच भरत दहा मोठ्या उद्योगसमुहांनी मिळून 30 हजार कोंटीची कर्ज घेऊन ती बुडविली. हे सर्व घडत असताना रिझर्व्ह बँकेने दुर्लक्ष करून कर्जबुडव्यांना मदत केली आणि कर्ज बुडवून झाल्यावर सरकारी स्टेट बँकेला 49 टक्के गुंतवणूक करून ही बँक वाचवायला लावली. सरकारी स्टेट बँक एका खासगी बँकेला जिवंत करण्यासाठी इतकी लगबग करते हे अनाकलनीय आहे. आताही पुनर्जीवित झालेल्या येस बँकेत स्टेट बँकेची 49 टक्केच गुंतवणूक आहे म्हणजे तितकाच अधिकार आहे. उर्वरित गुंतवणूक पुन्हा खासगी बँकांची आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा घोटाळा होऊच शकतो. तेव्हाही या धनिकांना वाचवायला सरकार धावेलच.
येस बँकेचे 12 हजार 808 कोटी रुपये अनिल अंबानीच्या दहा कंपन्यांनी बुडविले. म्हणजे अनिल अंबानी त्याच्या एकेका कंपनीच्या नावे कर्ज काढत गेला आणि बुडवत गेला. त्यानंतर सुभाष चंद्रा यांच्या एस्सेल समूहाने 8415 कोटी
बुडविले. इथेही एस्सेल समुहाच्या अंतर्गत 16 कंपन्या कर्ज काढत राहिल्या, बँक त्यांना कर्ज देत गेली आणि त्यांनी कर्ज बुडविले. दिवाण हौसिंग (डीएचएफएल), आयएल ॲण्ड एफएस, इंडिया बुल्स, खैतान कॉक्स ॲण्ड किंग्ज हे सर्व कर्जबुडवे आहेत. या कंपन्यांचेच सूटबुटातील उद्योगपती तोऱ्यात फिरत असतात. याच उद्योगपतींच्या यशोगाथा आपल्या कानीकपाळी मारल्या जातात. मोठमोठ्या समारंभात अर्थमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके दिली जातात. या धनदांडग्यांनी कर्ज बुडविली तर धंदा बसला हे कारण सांगतात, आर्थिक मंदीचे कारण सांगतात. तो उद्योगपती चांगला आहे, पण धंदा बसला म्हणून कर्ज बुडले असे गोंजारणे सुरू असते. प्रत्यक्षात बँक अधिकाऱ्यांना लाच देऊन आवश्यक तितके तारण न घेता बुडविण्यासाठी घेतलेली ही कर्ज आहेत. इथे देणारा लुटारू आहे आणि घेणाराही लुटारू आहे. अशा लुटारूंना मोठे का मानायचे? सरकार आणि रिझर्व्ह बँकेने त्यांच्यासाठी का धावायचे? अशा बँकांना मरू का देत नाहीत? स्टेट बँक त्यात पैसे का ओतते?
शेतकरी हवामानामुळे खरोखर कोसळतो तेव्हा कर्जफेडीसाठी बँका इतक्या मागे लागतात की बिचारा शेवटी झाडाला गळफास घेऊन यातून मुक्त होतो. एखाद्या होतकरू तरुण/तरुणीचा धंदा चालत नाही तेव्हा काही लाखांच्या कर्जासाठी त्यांचे घर जप्त करून त्याचा लिलाव होतो, मुलाच्या उच्चशिक्षणासाठी आई-बाप कर्ज काढतात आणि मग मुलाला नोकरी मिळाली नाही तर बाप दिवसभर ओव्हरटाईम करूनकरून खंगून जातो. या बिचाऱ्यांना कधीच कर्ज बुडवायचे नसते, पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्यांचे कर्ज थकीत राहते. त्यांना बँका कधी सोडतच नाहीत. त्यांच्या घराबाहेर थाळीनाद करतात, त्यांची नांवे जाहीर करतात, त्यांच्या घरी एजंट पाठवतात, त्यांना धमकीचे फोन केले जातात. कर्जाचा एक हप्ता भरला नाही की त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या आयुष्याची वाट लावतात आणि हे येस बँकेचे कर्जबुडवे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. एकालाही अटक झालेली नाही. एकाच्याही महालाबाहेर थाळीनाद झालेला नाही. समाजात वावरायला त्यांना लाज वाटेल असे सरकारने काही केले नाही आणि रिझर्व्ह बँकेनेही काही केले नाही. हे कर्जबुडवे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या कर्जाचे सर्व पैसे पचवून मजेत राहणार आहेत. लोकल खाली जीव देतो तो सामान्य माणूस, झाडाला लटकतो तो सामान्य माणूस, तणावाने हृद्यविकाराचा झटका येऊन मरतो तो सामान्य माणूस, तो साधासरळ असतो. त्याला कर्ज फेडायचे असते म्हणून तो जीवाला घोर लावून घेतो. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर अशांसाठी धावाधाव करीत नाही. सामान्यांनी आयुष्याची कमाई एखाद्या छोट्या बँकेत ठेवली आणि ती बँक बुडाली तर सरकार ती बँक वाचवायला जात नाही.
‘येस’ बँकेचा हा जो तमाशा सुरू आहे तो असाच वेगवेगळ्या रूपात सुरू राहणार आहे. कारण सिस्टिमच भ्रष्टाचाराने पोखरली आहे वरपासून खालपर्यंत. मग आपणही या श्रीमंत कर्जबुडव्यांसारखे बनायचे का? तर नाही. कारण हे कर्जबुडवे काळ्या धनाचे गुलाम आहेत. आपण नाही. आपण देवापुढे रोज मनोमन हात जोडतो, सद्बुद्धी मागतो. देवापुढे उभे राहण्याची ताकद आपल्या चांगल्या कर्मांमुळेच मिळते. ही ताकद आपण गमवायची नाही. त्या कर्जबुडव्यांना सरकार तारेल, रिझर्व्ह बँक तारेल, स्टेट बँक तारेल, पण खात्री ठेवा की, देवाची लाठी आवाज न करता त्यांच्यावर बरसणार आहे. आज ना उद्या त्याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसतीलच.कुटुंबच काय, देश सोडणेही धोक्याचे आहे.
‘येस’ बँकेचे सीईओ राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या उद्योगात कोट्यवधी पैसे गुंतवणुकीची लाच भरत दहा मोठ्या उद्योगसमुहांनी मिळून 30 हजार कोंटीची कर्ज घेऊन ती बुडविली. हे सर्व घडत असताना रिझर्व्ह बँकेने दुर्लक्ष करून कर्जबुडव्यांना मदत केली आणि कर्ज बुडवून झाल्यावर सरकारी स्टेट बँकेला 49 टक्के गुंतवणूक करून ही बँक वाचवायला लावली. सरकारी स्टेट बँक एका खासगी बँकेला जिवंत करण्यासाठी इतकी लगबग करते हे अनाकलनीय आहे. आताही पुनर्जीवित झालेल्या येस बँकेत स्टेट बँकेची 49 टक्केच गुंतवणूक आहे म्हणजे तितकाच अधिकार आहे. उर्वरित गुंतवणूक पुन्हा खासगी बँकांची आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा घोटाळा होऊच शकतो. तेव्हाही या धनिकांना वाचवायला सरकार धावेलच.
येस बँकेचे 12 हजार 808 कोटी रुपये अनिल अंबानीच्या दहा कंपन्यांनी बुडविले. म्हणजे अनिल अंबानी त्याच्या एकेका कंपनीच्या नावे कर्ज काढत गेला आणि बुडवत गेला. त्यानंतर सुभाष चंद्रा यांच्या एस्सेल समूहाने 8415 कोटी
बुडविले. इथेही एस्सेल समुहाच्या अंतर्गत 16 कंपन्या कर्ज काढत राहिल्या, बँक त्यांना कर्ज देत गेली आणि त्यांनी कर्ज बुडविले. दिवाण हौसिंग (डीएचएफएल), आयएल ॲण्ड एफएस, इंडिया बुल्स, खैतान कॉक्स ॲण्ड किंग्ज हे सर्व कर्जबुडवे आहेत. या कंपन्यांचेच सूटबुटातील उद्योगपती तोऱ्यात फिरत असतात. याच उद्योगपतींच्या यशोगाथा आपल्या कानीकपाळी मारल्या जातात. मोठमोठ्या समारंभात अर्थमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके दिली जातात. या धनदांडग्यांनी कर्ज बुडविली तर धंदा बसला हे कारण सांगतात, आर्थिक मंदीचे कारण सांगतात. तो उद्योगपती चांगला आहे, पण धंदा बसला म्हणून कर्ज बुडले असे गोंजारणे सुरू असते. प्रत्यक्षात बँक अधिकाऱ्यांना लाच देऊन आवश्यक तितके तारण न घेता बुडविण्यासाठी घेतलेली ही कर्ज आहेत. इथे देणारा लुटारू आहे आणि घेणाराही लुटारू आहे. अशा लुटारूंना मोठे का मानायचे? सरकार आणि रिझर्व्ह बँकेने त्यांच्यासाठी का धावायचे? अशा बँकांना मरू का देत नाहीत? स्टेट बँक त्यात पैसे का ओतते?
शेतकरी हवामानामुळे खरोखर कोसळतो तेव्हा कर्जफेडीसाठी बँका इतक्या मागे लागतात की बिचारा शेवटी झाडाला गळफास घेऊन यातून मुक्त होतो. एखाद्या होतकरू तरुण/तरुणीचा धंदा चालत नाही तेव्हा काही लाखांच्या कर्जासाठी त्यांचे घर जप्त करून त्याचा लिलाव होतो, मुलाच्या उच्चशिक्षणासाठी आई-बाप कर्ज काढतात आणि मग मुलाला नोकरी मिळाली नाही तर बाप दिवसभर ओव्हरटाईम करूनकरून खंगून जातो. या बिचाऱ्यांना कधीच कर्ज बुडवायचे नसते, पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्यांचे कर्ज थकीत राहते. त्यांना बँका कधी सोडतच नाहीत. त्यांच्या घराबाहेर थाळीनाद करतात, त्यांची नांवे जाहीर करतात, त्यांच्या घरी एजंट पाठवतात, त्यांना धमकीचे फोन केले जातात. कर्जाचा एक हप्ता भरला नाही की त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या आयुष्याची वाट लावतात आणि हे येस बँकेचे कर्जबुडवे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. एकालाही अटक झालेली नाही. एकाच्याही महालाबाहेर थाळीनाद झालेला नाही. समाजात वावरायला त्यांना लाज वाटेल असे सरकारने काही केले नाही आणि रिझर्व्ह बँकेनेही काही केले नाही. हे कर्जबुडवे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या कर्जाचे सर्व पैसे पचवून मजेत राहणार आहेत. लोकल खाली जीव देतो तो सामान्य माणूस, झाडाला लटकतो तो सामान्य माणूस, तणावाने हृद्यविकाराचा झटका येऊन मरतो तो सामान्य माणूस, तो साधासरळ असतो. त्याला कर्ज फेडायचे असते म्हणून तो जीवाला घोर लावून घेतो. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर अशांसाठी धावाधाव करीत नाही. सामान्यांनी आयुष्याची कमाई एखाद्या छोट्या बँकेत ठेवली आणि ती बँक बुडाली तर सरकार ती बँक वाचवायला जात नाही.
‘येस’ बँकेचा हा जो तमाशा सुरू आहे तो असाच वेगवेगळ्या रूपात सुरू राहणार आहे. कारण सिस्टिमच भ्रष्टाचाराने पोखरली आहे वरपासून खालपर्यंत. मग आपणही या श्रीमंत कर्जबुडव्यांसारखे बनायचे का? तर नाही. कारण हे कर्जबुडवे काळ्या धनाचे गुलाम आहेत. आपण नाही. आपण देवापुढे रोज मनोमन हात जोडतो, सद्बुद्धी मागतो. देवापुढे उभे राहण्याची ताकद आपल्या चांगल्या कर्मांमुळेच मिळते. ही ताकद आपण गमवायची नाही. त्या कर्जबुडव्यांना सरकार तारेल, रिझर्व्ह बँक तारेल, स्टेट बँक तारेल, पण खात्री ठेवा की, देवाची लाठी आवाज न करता त्यांच्यावर बरसणार आहे. आज ना उद्या त्याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसतीलच.कुटुंबच काय, देश सोडणेही धोक्याचे आहे.