Wednesday, 15 August 2018

विकत घेऊ का दर्शन?



     मला आठवतय मी वारीत चालत गेले आणि विठुरायाला गर्दीमुळे पाहू शकले नाही. कळसाचे दर्शन घेऊन परतले. पण मंदिरात जाता आले नाही म्हणून तो दिवस माझ्या कायम लक्षात राहिला. कळसाच्या दर्शनाने मी समाधानी होते पण मंदिरात शिरताच येत नाही असे प्रथमच झालं.

    त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाकालेश्वर ओंकारेश्वर आणि त्यानंतर महाकालेश्वर मंदिरात गेले. अत्यंत प्रसिद्ध अशी ही ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यामुळे गर्दीही खूप होती. आम्ही गर्दी टाळून दर्शन घेण्याचे नेहमीचे उपाय केले. प्रत्येकी २५० रू. देऊन व्हिआयपी पास घेतला आणि थेट गाभाऱ्यात पोहोचलो. मग आम्हाला हेरून पुजाऱ्याने चरण जल देतो म्हणून सांगत शंभर रुपयांची बोली केली. शेवटी मंत्रपठण करीत करीत आमच्याकडून ५०० रूपये लुटले. दुसऱ्या देवळात पहिला पहिला सौदा पैलतीरी नेणाऱ्या नावाड्याशी झाला. नावेतून उतरलो तर दहा रूपयांची फुलांची परडी समोर आली. ती घेतरी (परतून पैसे देतान ५० रू. मागितले तेव्हा कळले की परडीत हळूच ४० रूपयांचा प्रसाद टाकला होता आणि त्याचे पैसे मागत होते.) 
      पहिल्या पायरीवर पाय ठेवताच पुजाऱ्याने कोणती पूजा करणार म्हणून सुरूवात केली. दर्शन घेऊन आम्हाला एका हॉलमध्ये नेले. तिथे ओळीत १५/२० पिंडी आणि वर अभिषेक पात्र अशी आधीपासूनच व्यवस्था सज्ज होती. अभिषेक सुरू झाला. ओंजळीत जे देत होते ते वाहत होते. एकदम रूपयेही दान द्या म्हणाले. ती नोट ओंजळीत धरली तेव्हा ती ओली होऊ नये म्हणून पुजाऱ्याने शितापीने ती बोटात धरली. अभिषेक करताना यथाशक्ती दान द्या असी मंत्रातील उच्चार कानावर आले. पण अभिषेक संपल्यावर शंभर रूपये पुढे केल्यावर पुजारी वैतागले. प्रत्येकीकडून दान मागू लागले. आणखी द्या, आणखी द्या म्हणू लागले. मी काहीच दिल नाही म्हणताना पायऱ्यांपर्यंत माझा पाठलाग केला. देवाचा हा एजंट नाराज झाल्याने कटूता आली.


त्या दिवशी मी ठरवलं की, मी पुन्हा कधीही पैसे मोजून दर्शन करणार नाही आणि अभिषेक वगैरेही करणार नाही. दोन्ही देवळांत भक्तांची गर्दी होती. पण आम्ही नोट देताच गाभाऱ्यात पोहोचलो. मागे वळून बघितले तेव्हा रांगेत तासनतास उभे राहिलेले भक्त दिसले. त्यावेळी विचार आला की, देव मला नाही तर ताटकळत दर्शनासाठी उभ्या गरीब भक्ताला भेटेले.
       जे मद्यपदेशात घडले तेच महाराष्ट्रात आहे. हे एजंट बंद केले पाहिजेत. पुढे हे घडेलही पण तूर्त मी माझ्यापासून सुरूवात केली आहे.

    ( मी हिंदू धर्माच्या विरूद्ध बोलले, इतर धर्मांच्या विरूद्ध बोलले असे कुणी म्हणेल, मी देवळात अधूनमधून जाते म्हणून तिथला अनुभव सांगितला. माझ्यावर हिंदू धर्माचे संस्कार आहेत. मग मी इतर धर्मांबद्दल का बोलू? दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्म हा बदल स्वीकारमारा आहे. सुधारणा मान्य करणारा आहे. बंदिस्त नाही. त्यामुळे मन मोकळ करता येत.)

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...