Monday, 27 August 2018

मंगळागौरीचा इव्हेंट कधी झाला?


     पूर्वीच्या काळात लहान वयात विवाह होत असत. आषाढाचा पावसाचा मास सरला की श्रावणाच्या ऊन पावसाच्या खेळासह पूजा, मंत्रपठण आणि बालवयातील नवरीला काही वेळ नाच, गाण्यात रमता यावे म्हणून मंगळागौर जागरण सरू झाले असावे. फुगडी, झिम्मा, पिंगा यासर्वांची लहानपणी गंमत वाटते. वयात येणाऱ्या मुलींना या प्रकारच्या नाचगाण्यातून चांगला व्यायामही होत होता. जेवणानंतर तुळशीचे पानही खाल्ले जायचे. आरोग्य आणि विरंगुळा यासाठी सुरू केलेले हे प्रकार पाळले जावेत म्हणून त्याला पूजा अर्चेचीही गुंफण दिली गेली.


      दुर्दैवाने या दोन्हीचे एकत्रित महत्व समजून न घेता केवळ पूजाअर्चा, भोजन करायचे आणि मग मंगळागौरीची नृत्य करायला पैसे देऊन महिलांचे विविध ग्रुप बोलवायचे हा प्रकार सुरू आहे. ज्या घरातील नववधूची मंगळागौर असते ती तरूणी आणि घरातील महिला केवळ अधूनमधून नाच गाण्यात सहभागी होतात, बहुतांश वेळ त्या आलेल्या ग्रुपचा नाच बघत बसतात. आजकाल तर स्पर्धाही लावणे सुरू झाले आहे. सर्व वाहिन्यांवर मंगळागौर सुरू असते. अत्यंत पोक्त वयाच्या स्त्रिया मंगळागैर खेळतात. पण हे खेळ लहान मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी होते, त्यांच्या मनोरंजनासाठी होते हे आपण विसरलो आहोत. आता बालवयात विवाह होत नाहीत. तरीही या मुलींना हे खेळ शिकवले पाहिजेत. घागर फुंकणे, फुगडी घालणे हे व्यायामाचे प्रकार या मुलींना उपयुक्त आहेत. मंगळागौर या विचारानेच पुढे गेली पाहिजे. सुपारी देऊन बॅँड बोलवतात तसा मंगळागौर ग्रुप बोलवायचा आणि त्यांचा खेळ बघत बसायचे हे घडत राहिले तर मूळ उद्देश संपेल. घरच्या महिलांनी, मैत्रिणींसह धम्माल करीत हा खेळ खेळण्यातच आनंद आहे. मंगळागौरीचे इव्हेंट मॅनेजमेंट करू नका.x

No comments:

Post a Comment

शिवसैनिकांवर घोर अन्याय

                    आज अयोध्येत राममंदिर भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नाही हे पाहून शिवसैनिक निश्चित दुखावले गे...